तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे महत्त्वाचे का आहे आणि या मंत्राचे काय फायदे आहेत? ओम नमः शिवाय मंत्राचा जप सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक का मानला जातो? ओम नमः शिवाय मंत्र जपाच्या महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्या.

कालभैरव (दुष्ट प्राण्यांचा नाश करणारा), भोलेनाथ (साधा), आदियोगी (पहिला योगी), नटराज (नृत्याचा राजा), महादेव (सर्व दैवी प्राण्यांमध्ये श्रेष्ठ) असे त्यांचे विविध वर्णन केले गेले आहे आणि ही श्रेष्ठांची यादी पुढे  पुढे जातचं राहणार आहे.

खरंच, शिव कोण आहे? आणि ओम नमः शिवाय काय आहे?

उत्तरार्ध समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम शिव समजून घ्यावा लागेल.

शिव कोण आहे?

शिव म्हणजे ती शून्यता, अंतराळातील गडद रिकामा, ज्यातून सर्व सृष्टी – तारे, ग्रह, आकाशगंगा, पर्वत, महासागर, सर्व सजीव प्राणी इत्यादी – प्रकट होतात आणि ज्यामध्ये सर्व सृष्टीचे विघटन होते.

ही सर्वोच्च ऊर्जा कोण आहे याचा अधिक शोध घेत असताना मला जाणवले की शिव ही एक व्यक्ती नसून एक तत्त्व आहे. याला शिव तत्व म्हणतात, जे सर्वव्यापी चैतन्य आहे जे या शून्यतेला भरून काढते.

आज, खगोलशास्त्र देखील आपल्याला सांगते की विश्वाचा ९९.९९% भाग फक्त रिक्त आहे – शून्य आहे. तर, यातील ९५% ‘गडद पदार्थ(डार्क मॅटर)’ आणि ‘गडद ऊर्जा(डार्क एनर्जी’)’ आहे, ज्याला तथाकथित म्हणतात ,कारण ते प्रकाश प्रतिबिंबित करत नाहीत, शोषत नाहीत किंवा उत्सर्जित करत नाहीत आणि म्हणून कधीही दिसू शकत नाहीत.

शिव म्हणजे जे निष्पाप, परोपकारी, सुंदर, दिव्य आणि निरपेक्ष आहे. पंच महाभूत (पाच घटक), आपल्या अस्तित्वाचे सात स्तर आणि आपली चेतना यांचा एक विशिष्ट संबंध आहे. शिवऊर्जा ब्रह्मांडात झिरपते आणि तुम्हाला आढळेल की आपल्यामध्ये शिव तत्व – पूर्ण शून्यता – अनुभवणे शक्य आहे.

ओम नमः शिवाय मंत्राचे महत्त्व काय आहे?

मंत्र तुम्हाला तुमच्या स्त्रोताकडे परत आणतात. मंत्रांचा जप केल्याने किंवा ऐकल्याने कंपन निर्माण होते; सकारात्मक, जीवन उत्थान ऊर्जा, आणि सार्वत्रिक आहेत. ओम नमः शिवाय हा सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक आहे. या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवन प्रणालीमध्ये ऊर्जा निर्माण होते आणि वातावरणही स्वच्छ होते. हजारो वर्षांपासून लोक या मंत्राचा जप करत आहेत.

न म शि वा य – ही पाच अक्षरे पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश हे पाच घटक (संस्कृतमध्ये पंचभूत म्हणून ओळखले जातात) दर्शवतात. मानवी शरीरासह सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचे मुख्य घटक हे पाच घटक आहेत आणि भगवान शिव हे या पाच घटकांचे स्वामी आहेत. तर ‘ओम’ हा विश्वाचा नाद आहे.ओम म्हणजे शांती आणि प्रेम तर ‘ओम नमः शिवाय’ हा जप पर्यावरणातील पंचभूत घटकांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी केला जातो. जेव्हा पाचही घटकांमध्ये शांतता, प्रेम आणि एकोपा असतो, तेव्हा आनंद असतो आणि आनंद फक्त तुमच्या आतच नाही, तर तुमच्या अवतीभोवतीही असतो.

ओम नमः शिवाय चा जप केल्याने आपल्याला आपल्यातील पाच घटकांवर प्रभुत्व मिळवण्यास मदत होते, ज्यामुळे मन शांत होते. मौनामुळे शिवतत्त्वाचा अनुभव येतो. अशा प्रकारे या मंत्राद्वारे प्रत्येकजण शिवापर्यंत पोहोचू शकतो. या मंत्राचा जप आपल्या अस्तित्वाचे विविध कोश किंवा स्तर एकत्र करतो आणि आपल्यातील शिवाचे गुण वाढवतो. (आपल्या अस्तित्वाचे ७ स्तर आहेत: ) याचा मनाला शांत करण्यासाठी प्रभाव पडतो आणि ध्यानासाठी मनाला तयार करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

ओम नमः शिवाय मंत्राचा जप करण्याचे फायदे

  • ओम नमः शिवाय सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकते. हे एक तणाव-नाहीस करणारं साधन देखील आहे, जे तुम्हाला आराम करण्यास आणि विश्रांती घेण्यास मदत करते.
  • चंचल मन नियमित नामजपाने स्थिर आणि शांत होते.
  • ओम नमः शिवाय तुम्हाला तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. शेवटी हे तुम्हाला आपल्या मनावर राज्य करायला मदत करेल.
  • ओम नमः शिवाय तुम्हाला जीवनातील दिशा आणि उद्दिष्टाची जाणीव करुन देते.
  • नऊ ग्रह आणि २७ नक्षत्र आहेत. शिव तत्व हे अध्यक्षस्थानी असल्याने उर्जा आणि ग्रहांवर देखील नियंत्रण ठेवते, ओम नमः शिवाय चा जप केल्याने काही प्रमाणात अशुभ ग्रहांचे प्रभाव कमी होण्यास मदत होते.

ओम नमः शिवाय चा जप कसा करावा

  • सकाळी आंघोळ केल्यावर जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय चा जप करावा. दिवसाही जप करता येतो.
  • ओम नमः शिवाय चा जप करण्याची
  •          सर्वोत्तम वेळ म्हणजे सूर्योदय आणि 
  •          सूर्यास्त. तथापि, जरी आपण या   
  •          वेळा चुकवल्या तरीही, घाबरू नका,    
  •          हा शक्तिशाली मंत्र दिवसाच्या सर्व   
  •          प्रहारांमध्ये (वैदिक.    
  •          ज्योतिषशास्त्रातील वेळेचे एकक,   
  •          अंदाजे तीन तास) फायदेशीर ठरेल.
  • ओम नमः शिवाय एकतर मोठ्याने किंवा आपल्या मनात शांतपणे जप केला जाऊ शकतो.
  • ओम नमः शिवाय सलग १०८ वेळा जप केल्याने उत्तम अनुभव येतो.

ओम नमः शिवाय मंत्राचा जप तुमच्यासाठी

वर्षातील शुभ काळात, श्रावण महिन्याप्रमाणे, ध्यानाचा अनुभव अधिक सखोल घेण्यासाठी होऊ शकतो. जेव्हा ध्यान सखोल असते तेव्हा ते आपल्या शरीरात आणि मनामध्ये सुसंवाद आणण्यासाठी फायदेशीर ठरतात. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ऑनलाइन ध्यान आणि श्वास कार्यशाळेसह शक्तिशाली ध्यान, श्वासोच्छवासाची तंत्रे शोधा आणि शिव तत्वामध्ये खोलवर जा.

गुरुदेवांच्या ज्ञानावरील भाषणांवर आणि वैदिक धर्म संस्थेच्या माहितीवर आधारित.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *