प्रश्न : मंत्राचा जप (नामस्मरण) करण्याचे महत्व काय आहे?

श्री श्री : जेव्हा कुणी तुम्हाला शिव्यांची लाखोली वाहते तेंव्हा तुम्हाला कसे वाटते? जर कुणी तुम्हाला म्हटले की ‘तुम्ही गाढव आहात’ तर तुम्हाला कसे वाटते? त्याने तुम्हाला काय होते? त्याने काय निर्माण होते? राग!ते तुम्हाला हादरवून टाकतात. नकारात्मक तरंग उठतात, तुम्हाला राग येतो. तुमच्या पोटात, डोक्यात काहीतरी होऊ लागते. जर एखादा वाईट शब्द तुमच्यात इतक्या शरीरक्रियात्मक प्रतिक्रिया घडवू शकतो तर मग एखादा छानसा शब्द, वैश्विक शक्तीने भरपूर असा एखादा जपाचा मंत्र तुमच्या शरीरावर काहीच परिणाम करणार नाही?

मंत्राचा तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचे आहे. तसे नाही आहे, परिणाम हा होतोच. मंत्रामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. म्हणूनच त्याला ‘मंत्र कवच’ म्हणतात. मंत्रामुळे तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते.

कधी कधी तुम्हाला काही लोक भेटतात आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटते. तुम्हाला त्यांच्या कडून चांगले तरंग मिळत असतात. कधी कधी तुम्हाला असे लोक भेटतात की तुम्हाला त्यांना टाळावेसे वाटते. असे का होते माहिती आहे का? व्यक्तीच्या भोवतालचे नाकारात्मक तरंग त्यांना अनाकर्षक बनवतात. मंत्र या अनाकर्षक तरंगाना जास्त सकारात्मक, आकर्षक बनवतात. हाच मंत्र जपण्याचा फायदा आहे.

आज, तुम्ही जर न्यूयॉर्कला गेलात तर तुम्हाला अशी अनेक ठिकाणे दिसतील की जिथे लोक जप शिकतात. लोक संध्याकाळी एक तास मंत्र जप (नामस्मरण) करण्याच्या क्लासला जातात. ते ‘ओम नम: शिवाय, ओम नमो नारायणा, श्रीराम जयराम जय जय राम’ असा जप करतात. अर्थात त्यांचे उच्चार वेगळे असतात. चीनमध्ये ते ‘राधे राधे’ च्या ऐवजी ‘लाधे लाधे’ म्हणतात. तैवानमध्ये ७,००० ते ८,००० लोक मिळून ‘राधे गोविंद’ च्या ऐवजी, ‘लाधे गोविंद’ असे गात असतात. याने परिणाम होतो हे लोकांनी अनुभवले आहे.आणि खरेच तो होतो !

मग हे कधी करावे? जर तुम्ही प्राणायाम आणि ध्यानाच्या नंतर जप केला त्याचा जास्त चांगला परिणाम होतो. जर तुम्ही उतावीळपणाने केलात तर त्याचा तितकासा परिणाम होत नाही.

art of living store logo white

गुरुदेवांचे कालातीत ज्ञान

पुस्तके, फोटो फ्रेम्स आणि भावपूर्ण ठेवा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

मंत्रोच्चार म्हणजे केवळ शब्द उच्चारणे नसून, ती सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. ज्याप्रमाणे चुकीच्या शब्दांमुळे मनावर नकारात्मक परिणाम होतो, त्याचप्रमाणे मंत्रांच्या सकारात्मक लहरी आपल्या शरीरावर आणि मनावर खोलवर परिणाम करतात. मंत्रांचा जप केल्याने आपल्या भोवती एक ‘सुरक्षा कवच’ (Mantra Shield) तयार होते, जे नकारात्मक विचारांना दूर ठेवून मानसिक शांती प्रदान करते.
मंत्रांच्या उच्चारणामुळे शरीरात आणि मनामध्ये विशिष्ट कंपनं (vibrations) निर्माण होतात. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मते, हे कंपने आपल्यातील सुप्त सकारात्मक ऊर्जेला जागृत करतात. यामुळे तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची सकारात्मकता आणि आकर्षण निर्माण होते. हे केवळ आध्यात्मिक नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही मन शांत करण्याचे एक प्रभावी साधन आहे.
मंत्र जपण्याचा सर्वाधिक लाभ घेण्यासाठी ती प्राणायाम आणि ध्यानानंतर करणे सर्वात उत्तम मानले जाते. जेव्हा आपले मन शांत आणि स्थिर असते, तेव्हा मंत्रांचे कंपन अधिक प्रभावी ठरतात. उतावीळपणाने जप करण्यापेक्षा शांत चित्ताने, नियमितपणे केलेला जप जास्त परिणामकारक ठरतो.
नियमित मंत्र जपल्याने व्यक्तीच्या आसपासचे नकारात्मक तरंग कमी होऊन सकारात्मकता वाढते. यामुळे केवळ तणाव आणि क्रोधच कमी होत नाही, तर मन अधिक स्थिर राहण्यास मदत होते. जगभरात आता अनेक ठिकाणी लोक मानसिक शांती आणि आनंदासाठी मंत्र जपण्याचा सराव करत आहेत, ज्याचे सकारात्मक परिणाम अनेकांना जाणवले आहेत.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *