तामिळनाडूच्या युवाचार्यांनी कोईमतूर मध्ये निरामय आरोग्याची मोहीम गतिमान केली आहे. ते सेंद्रिय उत्पादनांची विक्री आणि आयुर्वेदाच्या वापराबाबत प्रोत्साहीत करत आहेत. नोव्हेंबरपासून निरोगी सेंद्रिय उत्पादने आणि किराणा मालाची घरपोच सेवा सुरु केली आहे. यामुळे आसपासच्या सेंद्रिय उत्पादक शेतकरी आणखी सेंद्रिय पिके पिकवण्यासाठी प्रोत्साहित होतील. जसजशी त्यांची मागणी वाढेल शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचा चांगला भाव मिळेल आणि ते ग्राहकांची मागणी पुरवण्यासाठी आणखी उत्पादन घेतील.
शहरातील काही ग्राहक जे दैनंदिन गरजू वस्तूंमध्ये बदल करून निरोगी पर्याय इच्छितात अशा व्यक्तींची माहिती युवाचार्यांनी मिळवली आहे.