सूर्यग्रहण काळात अन्न शिजवू नका किंवा खाऊ नका! सूर्यग्रहण संपल्यावर आंघोळ करून स्वयंपाक करावा! सूर्यग्रहण काळात घराबाहेर पडू नका! असे काही नियम पाळायचे आहेत का? सूर्यग्रहण काळात काय करावे? या वैश्विक घटनेसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती येथे देत आहोत.

सूर्यग्रहण म्हणजे काय?

ज्यावेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे सर्व एका रेषेत असतात, चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि त्यामुळे पृथ्वीवर सावली पडते. यामुळे सूर्याचे आंशिक किंवा पूर्ण ग्रहण होते. या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात.

तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीतरी ग्रहणाबाबत काही आगाऊ सूचना ऐकल्या असतील. आता, हे शक्य आहे की तुम्हाला सांगितलेल्या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यांपैकी तुम्ही एक असाल किंवा या कल्पनांना जुन्या आजीबाईंच्या दंतकथा म्हणून नाकारणाऱ्यांपैकी एक असाल.

पण, या कल्पनांमागील सत्य काय आहे? त्या दंतकथा आहेत की त्यांना काही वैज्ञानिक आधार आहे? चला, जाणून घेऊया.

सूर्यग्रहण : सत्य की दंतकथा?

सूर्यग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण १० जून २०२१ रोजी आहे. याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात कारण चंद्र सूर्यापासून जितक्या अंतरावर आहे तितक्या अंतरावर त्याचा व्यास सूर्याच्या व्यासापेक्षा लहान दिसतो. यामुळे सूर्याचा बराचसा प्रकाश रोखला जातो आणि सूर्य कंकणासारखा गोल दिसतो. ही घटना पश्चिम आणि पूर्व आशिया, भारत आणि पाकिस्तानच्या अनेक भागांमधून दिसून येईल.

सूर्यग्रहणांबाबत तुम्ही ऐकलेल्या काही सामान्य सूचना येथे आहेत: हे एक-एक करुन सत्य किंवा दंतकथा आहे हे तपासूया.

१. ग्रहणाच्या आधी आणि नंतर स्नान करावे

अंशतः सत्य.

सूर्यग्रहणानंतर गर्भवती महिलांना थंड पाण्याने स्नान करण्याचा सल्ला दिला जातो. हे सूक्ष्मजीवांच्या वाढीच्या कोणत्याही हानिकारक प्रभावापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आहे. थंड पाणी व्हॅगस मज्जातंतूला (हे व्हॅगस मज्जातंतू म्हणजे मेंदू व ओटीपोट जोडणारे) उत्तेजित करण्यास मदत करते, याचा संबंध विश्रांती आणि पचन प्रणाली किंवा पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्थेशी असतो. त्यामुळे पचनास मदत होते. मनाला व शरीराला आराम मिळतो.

२. ग्रहण लागण्याच्या किमान दोन तास आधी जेवावे

सत्य.

याची दोन कारणे आहेत.

सूर्याची नील आणि अतिनील किरणे नैसर्गिक जंतुनाशक म्हणून काम करतात. ग्रहणाच्या वेळेस असे घडते की सूर्यग्रहणाच्या वेळी त्यांची तीव्रता आणि तरंगलांबी इतर दिवसांसारखी नसते. परिणामी, ते किरण अन्न स्वच्छ करण्याची त्यांची नेहमीची भूमिका पार पाडत नाहीत आणि अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची अनियंत्रित वाढ होते. ही अतिरिक्त आणि नैसर्गिक संरक्षणात्मक यंत्रणा उपलब्ध नाही हे लक्षात घेता, सूर्यग्रहणाच्या किमान दोन तास आधी आपण खाणे थांबवावे असा सल्ला दिला जातो.

सूर्यग्रहणाच्या आधी आपण काय खाऊ शकतो याबद्दल काही सल्ले –

  • हलके, सहज पचणारे शाकाहारी अन्न खाणे चांगले.
  • अन्नात हळदीचा वापर करा कारण त्यात जीवाणूरोधक गुणधर्म आहेत.

त्याचप्रमाणे, सूक्ष्मजीवांच्या अनियंत्रित वाढीच्या शक्यतेमुळे तुम्ही ग्रहण काळात पाणी पिणे देखील टाळावे. पृथ्वीवरील सर्व जीवनाचा आणि उर्जेचा स्रोत सूर्य आहे. त्यालाच ग्रहण असल्याने शरीरातील सुद्धा उर्जेची पातळी कमी होते. यामुळे पचनक्रियाही मंदावते, यावेळी खाणे टाळण्याचे हे आणखी एक कारण आहे.

अपवाद :

तुम्ही गरोदर असाल, म्हातारे असाल, आजारी असाल किंवा तुमची वारंवार सजलीकरणाची (हायड्रेशनची) गरज भासणारी विशेष परिस्थिती असेल, तर तुम्ही उकळून थंड केलेले पाणी पिऊ शकता. त्यात तुळशी अर्क (एक वनौषधी जी सामान्यतः खोकला आणि सर्दीसाठी वापरले जाते) घालू शकता. त्याच्या विषाणूरोधी (अँटीव्हायरल) गुणधर्मांमुळे, तुमचे रक्षण होईल. मनुका, सुका मेवा खाऊ शकता. तुमची ऊर्जा वाढेल.

३. सूर्यग्रहण संपल्यानंतर शिजवलेले ताजे अन्न खावे

सत्य.

उरलेले अन्न ग्रहणादरम्यान सूर्याचे किरणोत्सर्ग शोषून घेऊ शकते. हे किरणोत्सर्ग हानिकारक असतात आणि अश प्रकारे ते अन्न दूषित होऊ शकते. त्यामुळे ग्रहण सुरु होण्यापूर्वी केलेले व उरलेले अन्न साठवून न ठेवणे हेच चांगले. ग्रहण संपल्यानंतर ताजे अन्न तयार करणे उचित आहे.

सूर्यग्रहणाच्या वेळी तुम्ही दह्यासारख्या आंबवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये दर्भ गवत (देस्मोटाच्य बिपिनता) ठेवू शकता. कारण दर्भ गवत हे नैसर्गिक जंतुनाशक आहे. ग्रहण संपल्यावर ते काढू शकता. वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की हे गवत हानिकारक रासायनिक संरक्षकांच्या जागी अन्न संरक्षक (टिकवून ठेवणारे) म्हणून देखील वापरले जाऊ शकते.

४. ग्रहण काळात थेट सूर्याकडे पाहणे टाळावे

सत्य.

सूर्याकडे थेट पाहणे योग्य नाही. ग्रहण काळात असे केल्याने डोळ्यांना कायमची इजा होऊ शकते. या वेळी सूर्याच्या किरणांच्या तीव्रतेमुळे डोळ्यातील पेशींना इजा होऊ शकते. दृष्टीपटल जाळून जाऊ शकतो.

तुम्ही प्रमाणित चष्म्यातून ग्रहण पाहू शकता, जे नियमित गॉगलपेक्षा हजारपट गडद असतात. उघड्या डोळ्यांनी थेट सूर्याकडे पाहण्याऐवजी तुम्ही प्रक्षेपित किंवा परावर्तित प्रतिमा देखील पाहू शकता. तुम्ही दुर्बिणी आणि दूरदर्शक यंत्र यांसारखे दृक विवर्धक (व्हिज्युअल मॅग्निफायर) पूर्णपणे टाळले पाहिजेत.

५. ग्रहण काळात घराबाहेर जाणे टाळावे

दंतकथा.

याला कोणताही शास्त्रीय आधार नाही किंवा आयुर्वेदात असे कोणतेही बंधन नाही. तथापि, गर्भवती महिलांनी जन्माला येणाऱ्या अपत्याच्या आरोग्यासाठी घरातच राहून जप आणि ध्यान करणे अधिक श्रेयस्कर आहे. ध्यान आणि नामजपाच्या सकारात्मक कंपनांचा बाळाच्या मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

गरोदर महिलांसाठीच्या सामान्य मार्गदर्शक तत्वांमध्ये असलेल्या दंतकथा आणि सत्यांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, येथे वाचावे.

६. सूर्यग्रहणाच्या वेळी ध्यान करावे

सत्य.

दररोज ध्यान करणे ही एक चांगली सवय आहे, विशेषतः सकाळी आणि विशेष करुन सूर्यग्रहणाच्या वेळी ध्यान अवश्य करावे. कारण मनाचा चंद्राशी आणि शरीराचा पृथ्वीशी संबंध असतो. सूर्य हा मन आणि शरीर या दोन्हींशी जोडलेला असल्यामुळे, जेव्हा तिन्ही खगोलीय पिंड एका सरळ रेषेत येतात, तेव्हा शरीराचे मनाशी एकत्रिकरण होते. त्यामुळे ध्यान करण्याकरिता ही योग्य वेळ असते.

तसेच, सूर्यग्रहणाच्या वेळी काहीही खाऊ नये असे सांगतात, कारण पोट रिकामे असणे हे ध्यानासाठी अनुकूल असते. शक्ती आणि ऊर्जेचा मुख्य स्त्रोत असलेल्या सूर्याच्या ग्रहणामुळे तुमची ऊर्जा पातळी नैसर्गिकरित्या कमी होते. ध्यान केल्याने तुमची उर्जा पातळी देखील वाढते.

सूर्यग्रहणाच्या वेळी निसर्ग स्वतःची काळजी घेतो असे म्हणतात. असे म्हटले जाते की गाणारे पक्षी गाणे थांबवतात आणि काही फुलांच्या पाकळ्या मिटतात. जसे निसर्गाने या प्राण्यांना स्वतःची काळजी घेण्यास शिकवले आहे, त्याप्रमाणे मानवांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे शहाणपणाचे ठरेल. ध्यान आणि नामजप याद्वारे ‘स्व’सोबत जोडले जाण्याकरिता ही तुमच्यासाठी योग्य वेळ असू शकते.

art of living store logo white

गुरुदेवांचे कालातीत ज्ञान

पुस्तके, फोटो फ्रेम्स आणि भावपूर्ण ठेवा

मनःशांती देणारे ऑनलाइन मार्गदर्शित ध्यान करा. विश्रांती आणि आरामाच्या नवीन स्तरांवर पोहोचा.

(डॉ. मिताली मधुस्मिता, वरिष्ठ आयुर्वेदिक डॉक्टर, श्री श्री तत्व, पंचकर्म- यांनी दिलेल्या माहितीवर आधारित)

आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आर्ट ऑफ लिव्हिंगनुसार, ग्रहण ही केवळ खगोलीय घटना नसून तिचा प्रभाव आपल्या सूक्ष्म शरीरावरही होतो. ग्रहणादरम्यान वातावरणातील ऊर्जा विस्कळीत असते, ज्यामुळे पचनशक्ती मंदावते आणि मनामध्ये अस्वस्थता किंवा थकवा जाणवू शकतो. म्हणूनच, या काळात मन शांत ठेवण्यासाठी आध्यात्मिक नियमांचे पालन करण्यास सुचवले जाते.
आयुर्वेदानुसार, ग्रहणादरम्यान सूर्याची किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचत नसल्याने अन्नामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. या काळात आपली जठराग्नी (पचनशक्ती) कमकुवत होते. म्हणूनच, ग्रहणापूर्वी किमान २-३ तास आधी हलके जेवण घ्यावे आणि ग्रहणाच्या काळात शक्यतो उपवास करावा किंवा फक्त पाणी/द्रव्य पदार्थ घ्यावेत.
ग्रहण हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत शक्तिशाली मानला जातो. असे म्हटले जाते की ग्रहणादरम्यान केलेले ध्यान हे सामान्य दिवसांच्या तुलनेत १०० पटीने अधिक फलदायी असते. जेव्हा बाह्य जग अंधारात असते, तेव्हा अंतर्मनात डोकावणे आणि मंत्रजप किंवा ध्यान करणे मनाला खोल विश्रांती आणि शुद्धी प्रदान करते.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खालील गोष्टी टाळाव्यात:
१. उघड्या डोळ्यांनी पाहणे: सूर्यग्रहण कधीही थेट उघड्या डोळ्यांनी पाहू नका, यामुळे दृष्टीला इजा होऊ शकते.
२. झोपणे: ग्रहणाच्या काळात झोपणे टाळावे; त्याऐवजी बसून मंत्रजप किंवा वाचन करावे.
३. महत्त्वाचे निर्णय: या काळात मन स्थिर नसल्यामुळे कोणतेही मोठे आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेऊ नयेत.
४. शारीरिक श्रम: जड व्यायाम किंवा थकवणारी कामे करणे टाळावे.
ग्रहणापूर्वी: घराबाहेरील अन्नावर तुळशीची पाने ठेवावीत, जेणेकरून अन्नाचे शुद्धीकरण होईल.
ग्रहणादरम्यान: जप, ध्यान किंवा ‘ॐ नमः शिवाय’ सारख्या मंत्रांचे पठण करावे.
ग्रहण सुटल्यानंतर: स्नान करावे आणि ताजे, गरम अन्न ग्रहण करावे. दानधर्म करणे देखील या काळात शुभ मानले जाते.
गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडणे टाळावे आणि तीक्ष्ण वस्तूंचा (जसे की चाकू, कात्री) वापर करू नये, अशी पारंपारिक धारणा आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांना मानसिक तणावापासून दूर ठेवून शांत वातावरणात ध्यानात वेळ घालवण्यास प्रोत्साहित करणे, ज्यामुळे बाळावर सकारात्मक परिणाम होतो.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *